ऐतिहासिक !!!!     पुरंदर तालुक्यातील “या” गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे सत्तेचाळीसाव्या वर्षात पदार्पण

ऐतिहासिक !!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे सत्तेचाळीसाव्या वर्षात पदार्पण

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील ऐतिहासिक असणार्या आंबळे येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात हनुमान जयंतीच्या निमित्ताने करण्यात आली आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे हे ४७ वे वर्ष असुन अखंडपणे ४७ वर्षे झाली गावात सप्ताहचे आयोजन करण्यात येत आहे.

हनुमान जयंतीच्या पावन मुहुर्तावर हनुमान जन्मोत्सवाने दिवसाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कलशपुजन,वीणापुजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पुजन करण्यात आले.

दुपारच्या सत्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर हरिपाठ, प्रवचन, किर्तन व हरिजागराने पहिल्या दिवसाची सांगता झाली.

दोन वर्षे कोरोना कालावधीत ग्रामस्थांना कुठेही एकत्र येण्याचा योगच आला नव्हता परंतु सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आंबळेतील ग्रामस्थांनी किर्तनासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *