पुणे
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ५५.७५ च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मार्टीन गप्टीलच्या नावे होता.
आता ऋतुराजने गप्टीललाही मागे सोडलं आहे. गप्टीलसह ऋतुराजने विराट कोहली आणि डेवोन कॉनव्हे यांनाही मागे सोडलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ऋतुराज गायकवाड -२२३ धावा
मार्टिन गप्टील – २१८ धावा
विराट कोहली – १९९ धावा
डेवोन कॉनव्हे – १९२ धावा