भयानक!!!!!       चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद,नवरा अन् सासूचा त्रास असह्य;पुणे जिल्ह्यातील “या” गावात महिलेनं संपवल जीवन

भयानक!!!!! चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद,नवरा अन् सासूचा त्रास असह्य;पुणे जिल्ह्यातील “या” गावात महिलेनं संपवल जीवन

पुणे

सासरकडून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणी पती आणि सासूला पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव राणी भागवत कदम असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणीवर तिचा पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम हे दोघेही सतत जाच करत होते. गेल्या काही दिवसांपासून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालत असे. तिला घरात कोंडून ठेवणे, उपाशी ठेवणे, मारहाण करणे असे प्रकार होत होते.

सततच्या या त्रासामुळे राणी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. अखेर तिने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

प्राथमिक तपासात राणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम यांना अटक करण्यात आली असून, पत्नीचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *