औरंगाबाद
जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घटांब्री येथील एका नवविवाहित जोडप्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे. विकास तायडे आणि सपना तायडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, विकास तायडे आणि सपना तायडे यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता.रविवारी विकास हा काही कामानिमित्त सिल्लोड शहरात गेला.त्याचवेळी पत्नी सपना हिने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान, पत्नी सपनाने आत्महत्या केल्याची बातमी कळताच विकासला जबर धक्का बसला.
या धक्क्यातून विकासला सावरणं अशक्य झालं आणि त्याने सुद्धा रस्त्याने येत्या वेळेस अंभईजवळील बोरगाव येथील खेळणा नदीच्या पुलावर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.दरम्यान, विकास आणि सपना यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.पत्नी आणि पतीने एकाच दिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.