पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वीर येथील धरणक्षेत्रात गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याचीआवक वाढत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातुन रात्री आठ वाजता ८०० क्युसेक्सवेगाने निरा नदीपात्रात विसर्ग सुरु झाला होता.शनिवारी पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्गसुरु आहे.

वीर धरण विद्युत गृहातुन रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक्स वेगाने निरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.रात्री१२:३० वाजता धरणाच्या सांडव्यातुन ४,६३७ क्युसेक्स वेगाने तर पहाटे २:०० वाजता विसर्गाचा वेग वाढवुन १२,४०८क्युसेक्स तर पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गाच्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो व याकाळात नदीकाठच्या रहिवाशांनी काळजीघ्यावी,निरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन निरा पाठबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे.