साहेब, तुम्ही कधी कोणावर प्रेम केल होत का हो ? शेतकरी असल्यावर प्रेम करणं चुकीच आहे का ? असं म्हणत “या” पठ्ठ्याच थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र !!!!!

साहेब, तुम्ही कधी कोणावर प्रेम केल होत का हो ? शेतकरी असल्यावर प्रेम करणं चुकीच आहे का ? असं म्हणत “या” पठ्ठ्याच थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र !!!!!

हिंगोली

आपण अल्प-भूधारक शेतकरी असल्याने आपलं प्रेम नाकारलं गेल्याची खंत एका प्रेमवीर तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित व्यक्त केली आहे.

आपण शेतकरी असून आपली फार कमी जमीन आहे, त्यामुळेच आपलं प्रेम नाकारलं गेल्याच दुखं त्याने व्यक्त केले आहे. या पत्रात तरुणाने आपलं नाव लिहीले नाही.

शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं आहे का ? असा सवाल तरुणाने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. साहेब लिहताना खूप दुख होत आहे. महाराष्ट्राचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.

तुम्ही कधी प्रेम केलं का हो? प्रेम केलं असेल तर मला सांगा, प्रेम काय फक्त धन दौलतीचं मोहताज आहे का ? मी कोणावर तरी प्रेम केलं आणि जमीन कमी आहे म्हणून माझं प्रेम नाकारलं गेल.

साहेब तुम्ही सर्वांच ऐकून घेता, त्यांचे प्रश्न सोडवता. मला या पुरोगामी महाराष्ट्रात आत्महत्या करावी लागत असेल तर मी धिक्कार करतो या प्रेमाचा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *