संतापजनक!                 शाळेतील नराधम शिपायाकडून पाच शाळकरी मुलींचा विनयभंग

संतापजनक! शाळेतील नराधम शिपायाकडून पाच शाळकरी मुलींचा विनयभंग

पुणे

मागील काही दिवसांपासून मुंबई शहरात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली. यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे मुंबई पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे वांद्रे परिसरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

शाळेत काम करणाऱ्या एका नराधम शिपायाने ५ शाळकरी मुलींचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलींनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. शाळा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रॉमबोस बावीकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी शिपायाचं नाव आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही पीडित मुली एकाच शाळेत  शिक्षण घेतात.आरोपी शिपाई देखील याच शाळेत काम करतो. शाळेत सहामाई परीक्षा असताना आरोपीने पाचही मुलींसोबत आक्षेपार्ह संभाषण केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने मुलींना फोन करून त्याचा सोशल मीडियावरही पाठलाग केला.

२ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हा संपूर्ण घडला. सुरुवातील पाचही मुलींनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, आरोपी अधिकच त्रास देत असल्याने त्यांनी या प्रकाराची तक्रार शाळा प्रशासनाकडे केली. शाळा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *