शिवसेना फुटली ? आता काँग्रेस फुटली ? शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल

शिवसेना फुटली ? आता काँग्रेस फुटली ? शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल

मुंबई

शिवसेनेत बंडाचे वारे सुरु झाल्याने सकाळपासून राज्यातील वातावरण पुरते हादरलेले असताना आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी येत आहे.काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल झाले आहेत.

सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. यामुळे काँग्रेसने सर्व आमदारांना दिल्लीत बोलविणे पाठविल्याची माहिती मिळत होती. मात्र,अचानक शिवसेनेतील वादळाची बातमी धडकली आणि काँग्रेस मागे पडली होती.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते. या साऱ्या घडामोडींवर काँग्रेसने आपल्या आमदारांना तातडीने मुंबईला बोलविले आहे. तसेच दिल्लीतून प्रभारी देखील नियुक्त करण्यात आला आहे.

यातच काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल येत आहेत. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेस नेते देखील या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *