“या” गावच्या सरपंचांच्या हल्लेखोरास तत्काळ अटक करा ; सरपंच परिषदेची मागणी

“या” गावच्या सरपंचांच्या हल्लेखोरास तत्काळ अटक करा ; सरपंच परिषदेची मागणी

अहमदनगर

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी गावचे सरपंच बबन भुसारी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भुसारी हे गंभीर जखमी झाले आहेत.हल्लेखोरास तात्काळ अटक करावी अशी मागणी सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने पोलिसांना करण्यात आली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मुंगी ग्रामपंचायत क्षेत्रात एकाने अनाधिकृत नळ कनेक्शन घेतल्याने संबंधित त्या ठिकाणी सरपंच बबन भुसारी व ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांनी संबंधितास अनाधिकृत नळ कनेक्शन हे नियमित करून घेण्यास सांगितलं. त्यावेळी संबंधिताने सरपंच भुसारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

या घटनेत सरपंच भुसारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी प्रमोद गायकवाड यास पोलिसांनी तत्काळ अटक करावी अशी मागणी सरपंच परिषदेनं पोलिसांना केली आहे.

सरपंच परिषद नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करीत जोपर्यंत हल्लेखोर गावगुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत संघटना स्वस्थ बसणार नाही असे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *