मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला : विजय शिवतारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला : विजय शिवतारे

पुरंदर

पुरंदर उपसा जनाईसह सर्व उपसा योजनांचा वीजदर पूर्ववत

सासवडच्या पालखीतळ मैदानावर पुरंदरवासियांच्या साक्षीने राज्यातील जनतेला दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पाळला. उपसा सिंचन योजनांचा बेसुमार वाढलेला वीजदर कमी करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अवघ्या १९ टक्के रकमेत पाणी द्यावे अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी मान्य करत उपसा योजनेचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत शासन आदेश काढत वीजदर पूर्ववत करण्याचा निर्णय जारी केला आहे.

पूर्व पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वीजदर पूर्ववत केल्यानंतर पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातील विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरणहोते. याबाबत बोलताना वाघापूर येथील श्री. नितीन कुंजीर म्हणाले, शिवतारे यांच्या मागणीला उचलून धरत मुख्यमंत्र्यांनीघेतलेला निर्णय हा या भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंददायी आहे. शिंदे सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहेहेच यातून दिसून आले आहे असेही कुंजीर म्हणाले.

या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील दिवे पंचक्रोशी, आंबोडी, सिंगापूर, वनपुरी, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, पारगाव, खानवडी, राजेवाडी, टेकवडी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, बेलसर, माळशिरस, मावडी, पिंपरी, पिसर्वे, नायगाव, कोथळे, रानमळा, पांडेश्वर, रोमनवाडी, अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असताना त्यांनी उपसा सिंचन योजनांचा वीजदर १ रुपये १६ पैसे प्रतियुनिट करून अवघ्या १९ टक्के दरात राज्यभरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले होते.

शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीची उर्वरित ८१ टक्के रक्कम शिवतारे यांनी राज्यातील कारखान्यांवर लादली होती. मात्र पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वीजदर १.१६ वरून ३ रुपये ६९ पैसे इतका वाढवला होता. जुन्या दराने शेतकऱ्यांना प्रति दशलक्ष घनफूट पाण्यासाठी साधारणतः १२ हजार रुपये खर्च येत होता. पण अचानक वीजदरात केलेल्या वाढीमुळे हा खर्च ३३ हजार रु प्रति दशलक्ष घनफूट पर्यंत गेला. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यकाळात झालेली ही वाढ आता शिंदे सरकारने रद्द करून पुन्हा शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *