मानव संरक्षण समिती नवी दिल्ली (रजि.भारत सरकार ) चे जनसंपर्क कार्यालय

मानव संरक्षण समिती नवी दिल्ली (रजि.भारत सरकार ) चे जनसंपर्क कार्यालय

महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी पहिलेच उद्घाघाटन*

करमाळा 

मानव संरक्षण समिती नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) या समिती चे कार्य संपूर्ण देशात चालु आहे. आणि  समितीचेजनसंपर्क कार्यालय हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. व या जनसंपर्क कार्यालयाचे महाराष्ट्रात प्रथमच तालुक्याच्याठिकाणी करमाळा तालुक्यातील जेऊर येथे 27-06-2021रोजी करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटीलयांच्या हस्ते उद्घाघाटन करण्यात आले, यावेळी समितीचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी जी.एम भगतसर,  सातारा जिल्हा जनसंपर्क अधिकारी अशोक हारे , सातारा जिल्हा सह निरीक्षक राजकुमार मेटकरी , फलटण तालुका जनसंपर्क अधिकारी कदिर मुजावर  , सोलापूर जिल्हा जनसंपर्क अधिकारी सुहासनाबागेहळ्ळीकर , सोलापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार वैजंती काशिद व संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षनितीन खटके, संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब साबळे, निलेश राऊत सरपंच कोंढेज, सविता शिंदेऑल इंडिया समाजवादी पार्टी युवक संघटना उपाध्यक्षा आणि करमाळा तालुका वकील संघटना अध्यक्षा या सर्वांच्याउपस्थित उद्घाघाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार नारायण पाटील यांचा सत्कारसमितीचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी जी.एम भगत सर यांच्या हस्ते करण्यात आला, समितीचे वरिष्ठपदाधिकारी जी.एम भगत सर व त्यांचे सहकारी यांचा सत्कार माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाव करमाळा तालुका टिम पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम हा सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला, याकार्यक्रमात बोलताना समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी जी.एम भगत सर यांनी करमाळा तालुका टिमलामोलाचे मार्गदर्शन केले  व माजी आमदार नारायण पाटील यांनी मानव संरक्षण समिती करमाळा टिम ला कोणत्याहीगोष्टीची अवश्यकता भासल्यास मी मदत करण्यास आहोरात्र तयार आहे असे आश्वासन दिले, सविता शिंदे ऑल इंडियासमाजवादी पार्टी युवक संघटना उपाध्यक्ष आणि करमाळा तालुका वकील संघटना अध्यक्षा यांनी पुढील वाटचालीसशुभेच्छा दिल्या , संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन खटके यांनी ही मदतीचे आवाहन करून पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाचे जेऊर केंद्राचे सेवानिवृत्त  केंद्रप्रमुख श्री कल्याण  मंगवडे यांनीसूत्रसंचालन केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव संरक्षण समिती नवी दिल्ली रजि.भारत सरकार शाखाकरमाळा चे अध्यक्ष सोमनाथ वाघमारे  व महीला अध्यक्षा विजया कर्णावर व करमाळा टिमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीसहकार्य केले होते. प्रदिप पवार सर हेड जनसंपर्क अधिकारी मानव संरक्षण समिति यांनी कार्यक्रमाचे शेवटीआभार प्रदर्शनकेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *