महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरवलेल्या परिंचे ग्रामपंचायतीच्या जनता दरबारास उदंड प्रतिसाद

महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरवलेल्या परिंचे ग्रामपंचायतीच्या जनता दरबारास उदंड प्रतिसाद

पुरंदर

परिंचे ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा जाधव यांच्यावतीने यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते.या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ऋतुजा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या जनता दरबार उपक्रमासाठी गावातील महिला व ग्रामस्थ आपल्या अडचणी तक्रारींचे अर्ज घेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद सदस्य यांनी जनता दरबार हा उपक्रम तालुक्यात प्रथमच परिंचे गावात राबविल्या बद्दल कौतुक केले. जनता दरबार अंतर्गत शासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न गावपातळीवर मिटवण्यासाठी उपयोग होणार असल्याचे सांगितले.सरपंच ऋतुजा जाधव यांनी जनता दरबारची संकल्पना स्पष्ट करून गावातील समस्या व अडचणी लोकांनी अर्जाच्या माध्यमातून मांडाव्यात त्यानंतर या बद्दलचा पाठपुरावा ग्रामपंचायत परिंचे यांच्या मार्फत केला जाणार असल्याचे सांगितले. आलेल्या अर्जांची नोंदवही बनविण्यात आलेली असून संबंधित विभागांना सदरची कामे करण्यास भाग पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या जनता दरबारात महसूल विभाग, ग्रामपंचायत, कृषी विभाग, महावितरण, शिक्षण, पोलिस, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, सोसायटी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, पशुसंवर्धन विभाग, पोस्ट, रेशनिंग, एस टी, वनविभाग, पोलीस, बचत गट, जलसंधारण आदी विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच दत्तात्रय राऊत, माजी सरपंच समीर जाधव, मयूर मुळीक, पुष्कराज जाधव, पशुधन विकास अधिकारी आर एन ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी स्वप्नाली शिंदे, विद्युत अभियंता योगेश बुरसे, कृषी पर्यवेक्षक एस एस किरकोळे, ग्रामपंचायत सदस्य शैला जाधव, वंदना राऊत, पुष्पलता नाईकनवरे, अर्चना राऊत, प्रविण जाधव, गणेश पारखी, अजित नवले, पांडुरंग जाधव, संभाजी नवले, उल्हास जाधव, , लक्ष्मणराव जाधव, बाळासाहेब जाधव, शामकांत जाधव, शशिकांत जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, तलाठी सुजीत मंडलेचा, कृषी सहायक संदेश समगीर, आरोग्य सेवक प्रकाश चव्हाण, वैशाली भगत, सी टी कुदळे, प्रदीप जाधव, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गट प्रतिनिधी, दत्तात्रय कांबळे आदीसह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकेत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शशांक सावंत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *