साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला अख्खा अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं

साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला अख्खा अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र या निर्णयावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

“साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला अख्खा अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीने सदरील निर्णय महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेला लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटमध्ये म्हटले कि, “आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वगळता सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि सेल तात्काळ बरखास्त करण्यात आले आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *