संतापजनक!!!!!चारित्र्याच्या संशयावरून उच्चशिक्षित पतीने आपल्याच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून केली हत्या

संतापजनक!!!!!चारित्र्याच्या संशयावरून उच्चशिक्षित पतीने आपल्याच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून केली हत्या

औरंगाबाद

औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपलाच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागात घडली. सातारा पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या आईचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षाच्या बाळाचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपीने खुद्द पहाटे २ वाजता पोलिसांना आपण खून केलेल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल चार्जरच्या वायरने पतीने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली आहे.

सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात आरोपी हा आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. यावरूनच काल पुन्हा जोरदार वाद झाले आणि याच रागाच्या भरात पतीने पत्नी आणि मुलगा यांची गळा आवळून हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *