शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधीच येणार नाही ।।।। अस म्हणत “या” तरुण शेतकऱ्यानं जीवनयात्रा संपवली

शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधीच येणार नाही ।।।। अस म्हणत “या” तरुण शेतकऱ्यानं जीवनयात्रा संपवली

पंढरपूर

राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकार उदासीन असल्याचा आरोप विरोधी पक्षांसह शेतकरी नेते आणि सामान्य शेतकऱ्यांकडूनही करण्यात येतो. मात्र, सरकार कोणतंही असो, त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम शेतकरी आत्महत्या होताना सातत्यानं पाहायला मिळत आहे.

पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. महत्वाची बाब म्हणजे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओही रेकॉर्ड केलाय या व्हिडीओमध्ये तो विषारी औषध घेताना दिसून येत आहे.

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीचा सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. विष प्राशन करतानाचा स्वत:चा व्हिडीओही त्याने व्हायरल केला.

त्यानंतर या तरुणाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.

विष प्राशन करताना या तरुणाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलीय. ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. शेतकरी नामर्द आहे.

शेतकऱ्याच्या जन्माला आपण कधीच येणार नाही. सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादी लागत नाही. शेतकऱ्याचा कधीही विचार करणारं नाही हे सरकार. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही’, असं म्हणत सुरजने विष प्राशन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *