शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये थांबवता येत नसतील,तर येणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांनी किल्ले शिवनेरीवर पाय ठेवू नये

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये थांबवता येत नसतील,तर येणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांनी किल्ले शिवनेरीवर पाय ठेवू नये

पुणे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून थेट मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे.राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज, बुधवारी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली.

यावरून लोढा यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे.मूळ मुद्द्यांपासून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशी वक्तव्ये वारंवार केली जात आहेत.

यापुढे शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा कोल्हे यांनी यावेळी दिला. शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये थांबवता येत नसतील, तर येणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांनी किल्ले शिवनेरीवर पाय ठेवू नये, असंही कोल्हे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *