“शिवसेना उद्धव ठाकरे गट” आणि “राष्ट्रवादी”एकत्रित करून त्यांना “खंजीर” चिन्ह द्यायला पाहिजे होतं

“शिवसेना उद्धव ठाकरे गट” आणि “राष्ट्रवादी”एकत्रित करून त्यांना “खंजीर” चिन्ह द्यायला पाहिजे होतं

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरण करून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून लोकांच्या सहजपणे लक्षात आलं असतं अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर केली आहे.

ते बारामतीमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्यभरात सध्या शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला दिलेल्या मशाल आणि ढाल-तलवार चिन्हांची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीकडून ढाल-तलवार म्हणजे भाजपची ढाल आणि ईडीची तलवार असा आरोप शिंदे गटावर करण्यात येत आहे.

अशातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिन्हावरुन टीका केली आहे. पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण करून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून लोकांच्या सहजपणे लक्षात आलं असतं.मशाल हे चिन्ह रुजवायला त्यांना वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात आलं असतं की राष्ट्रवादीचा हा जन्मच खंजिरातून झालेला आहे अशी बोचरी टीका त्यांनी शरद पवारांवर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *