शिवतारेंना कोणाचा फोन? प्रश्नावर अजितदादांचा पारा चढला,तुम्ही मला मूर्ख समजू नका,मी सांगायचं…

शिवतारेंना कोणाचा फोन? प्रश्नावर अजितदादांचा पारा चढला,तुम्ही मला मूर्ख समजू नका,मी सांगायचं…

पुणे

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जाऊन अभिवादन केले. यावेळी लवकरच फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक उभारण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. बंडखोरीची तलवार म्यान करणारे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, अजितदादांनी बैठकीत काय घडलं यासंदर्भात माहिती दिली.

महात्मा फुले यांच्याविषयी अजित पवार बोलून झाल्यानंतर पत्रकारांनी ‘दादा, एक राजकीय प्रश्न आहे…’ असं म्हणताच ‘अरे अरे अरे… कुठेही काहीही’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. विजय शिवतारे यांना आयोजित केलेल्या सभेवर अजित पवार म्हणाले, की “आज विजयराव शिवतारे साहेबांनी स्वतः सभा आयोजित केली आहे.

ज्यावेळीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मी, शिंदे, शिवतारे आणि देवेंद्र फडणवीस असे चौघं बसलो होतो, त्यावेळी त्यांनी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, बारामतीतील एमआयडीसी असे स्थानिक विषय मांडून आम्ही चर्चा केली. शिवतारे म्हणालेस की मी महायुतीच्या सोबत आहे, पण तुम्हा तिघांनी माझे काही प्रश्न मार्गी लावले पाहिजेत.” असं अजित पवार सांगत होते.पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आहे.. मग त्यात भोर किंवा इतर भागातले प्रश्न आले. हे विषय सोडवण्यासाठी चर्चा झाली.

त्यावेळेस ते म्हणाले की मी सभा आयोजित करतो, त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे. मी शब्द दिला, की ज्या दिवशी तुम्ही सभा आयोजित कराल, त्या दिवशी येऊ, त्यानुसार ११ तारखेला सभा आयोजित केली. मी आणि एकनाथ शिंदे तिथे जाणार आहोत” असं अजित पवार म्हणाले.हाच विषय सुरु असताना विजय शिवतारेंना कोणाकोणाचे फोन आले? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी सांगायचं तेवढं सांगितलं आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे, त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं बोललो आहे. जागावाटपाचं पण सगळं होईल, आपण काळजी करु नका, जे मतदारसंघ बाकी आहेत, ते पुढच्या टप्प्यात आहेत. नाशिक किंवा कोकण – हे पाचव्या टप्प्यात आहेत, त्याला विलंब आहे, अजून फॉर्म भरायला सुरुवात झाली नाही.

आज मी मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास करणार आहे, तेव्हा आम्ही बोलू, नंतर फडणवीसही असतील, मी मुंबईत असणार आहे, बसून योग्य तो मार्ग काढू. विदर्भात पहिल्या टप्प्यातील निवडणुका असून. चंद्रपूर आणि रामटेकला नरेंद्र मोदींची सभा झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला” असंही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *