शिंदे – फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का?

शिंदे – फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का?

मुंबई

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे शिवराय,आंबेडकरांचा अवमान करणारे भाजपला दिसत नाहीत. त्यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का, असा सवाल उपस्थित केला आहे. तर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र बंद करायला हवा होता, मुख्यमंत्री स्वत:च ठाणे शहर बंद करत आहेत. आणि गृहमंत्री पाहतायत, असा टोला राऊत यांनी लगावला.महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणारच आहे. सरकारवर घणाघात होणार, या भीतीने पाय लटपटू लागले आहेत. आमच्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेरा अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *