“या” मध्ये शरद पवारांनी विनाकारण राजकारण करू नये

“या” मध्ये शरद पवारांनी विनाकारण राजकारण करू नये

पुणे

अनिल देशमुख, संजय राऊत यांना अटक करणारी एजन्सी वेगळी व जामीन देणारे न्यायालय आहे.जामीन देण्याचे कारण त्यामध्ये काहीतरी असावे.अटक करण्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो;त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य आम्हाला लागू होत नाही. शरद पवारांनी विनाकारण यामध्ये राजकारण करू नये;असा निशाणा मंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला आहे. अनिल देशमुख, संजय राऊत यांना केलेली अटक म्हणजे सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या आरोपावर मंत्री गुलाबराव पाटील प्रत्युत्तर देताना बोलत होते.

अटक करण्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य आम्हाला लागू होत नाही. दरम्यान संजय राऊत,अनिल देशमुख यांना अटक करणारी एजन्सी वेगळी आहे. तर जामीन देणारे न्यायालय आहे. इतके दिवस न्यायालयाने जामीन न देण्याचे कारण त्याच्यामध्ये काहीतरी असावं असे देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *