भयानक !!!!!!                                                 तू आम्हाला आवडत नाहीस, तुझ्या माहेरी निघून जा असे म्हणत विवाहितेचा केला छळ; शेवट सासू-नवऱ्याने विवाहितेला जिवंत जाळलं

भयानक !!!!!! तू आम्हाला आवडत नाहीस, तुझ्या माहेरी निघून जा असे म्हणत विवाहितेचा केला छळ; शेवट सासू-नवऱ्याने विवाहितेला जिवंत जाळलं

बीड

एक तर तू आम्हाला आवडत नाहीस आणि दुसरं तुला आजार आहे, यामुळे तू तुझ्या माहेरी निघून जा, असं म्हणत बीडच्या एका विवाहितेचा अतोनात छळ करण्यात येत होता. मात्र छळाचा अंत पती आणि सासूने विवाहितेला जाळण्यात झाला. १४ एप्रिल रोजी बीडमधील महिलेला जिवंत पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, यात तब्बल ५८ टक्के भाजलेल्या सुनेचा १९ दिवसांनी मृत्यू झाला.


जवळपास तीन आठवडे जीवन-मृत्यूशी चाललेली महिलेची झुंज संपली. आज सकाळी उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेची सासू आणि पती या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की बीडमधील एमआयडीसी भागात हनुमान नगर मध्ये राहणाऱ्या निकिता ऋषिकेश कांबळे (वय वर्ष २१) हिचा विवाह एका वर्षापूर्वी ऋषिकेश कांबळे याच्यासह झाला होता. काही दिवस गुण्या गोविंदाने संसार झाल्यानंतर अचानक सासू आणि पतीकडून महिलेला त्रास सुरू झाला.पती आणि सासू यांनी ‘तू आम्हाला आवडत नाहीस आणि तुला आजार देखील आहे.

तू तुझ्या घरी जाऊन नीट होऊन ये’ असं सांगितलं. वादावादीत सून आपलं म्हणणं ऐकत नाही आणि तिचा कसलाही फायदा आपल्याला होत नाही, कारण घरातील सगळी कामं आपल्याला करावी लागतात आणि दुखण्याच्या बहाण्याने सून झोपून राहते, या कारणावरुन सासूने महिलेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकलं, तर नवऱ्याने काडी लावत तिला पेटवून दिलं.

या प्रकरणी घटना झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासू कुसुम कांबळे या दोघा मायलेकांना ताब्यात घेतले होते. मात्र आता तिचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर कलम ३०२ देखील वाढवण्यात आला आहे. अवघ्या २१ वर्षांच्या विवाहित महिलेचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *