नवरा तुरूंगात जाताच बायकोचं दुसरं लग्न…. कोठडीतून बाहेर येताच सासूवर काढला ‘असा’ राग

नवरा तुरूंगात जाताच बायकोचं दुसरं लग्न…. कोठडीतून बाहेर येताच सासूवर काढला ‘असा’ राग

मुंबई

लग्नाचे बंधन अतिशय पवित्र मानले जाते. लग्नामुळे प्रत्येक मुलगा-मुलगी आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात करतो. नवीन घर, नवीन लोकं यासर्वांतून मुलीला आपला संसार सांभाळायचा असतो आणि महिलांना हे चांगलं जमतं सुद्धा. परंतु कधी-कधी नवरा-बायकोंमध्ये अशा घटना घडतात जे ऐकून लोकांना ही धक्का बसतो. सध्या अशाच एका बातमीची सर्वत्र चर्चा होत आहे. इथे एका नवऱ्याने आपली बायको पळून गेली म्हणून आपल्या सासूची हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इक्बाल अब्बास शेख असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने 2011 मध्ये लीना नावाच्या महिलेशी लग्न केले होते. दोघांनाही दोन मुले आहेत. अब्बासला एका प्रकरणामुळे 2018 मध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, ज्यामुळे त्याला काहीवर्षांसाठी तरुंगात जावे लागले. पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नीला मुलांच्या संगोपनाची काळजी वाटू लागली. म्हणून तिने दुसरे लग्न केले.
काही वर्षांनंतर जेव्हा अब्बास तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आला. तेव्हा घरी आल्यावर त्याला आपल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने रागाच्या भरात स्वत:वरील ताबा गमावला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अब्बास आपल्या पत्नीच्या माहेरी गेला आणि तिला घरी परत येण्यास सांगितले. पतीच्या या बोलण्यावर तेव्हा पत्नीने संमती दर्शवली, त्यानंतर अब्बास तेथून निघून आला. पत्नी घरी आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पत्नीला आणायला तिच्या माहेरी पोहोचला तेव्हा त्याला त्याची पत्नी दिसली नाही. त्याने आपल्या सासूला बायकोबद्दल वारंवार विचारले असता सासूने त्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले.

वारंवार काहीही विचारल्यानंतर उत्तर न मिळाल्याने अब्बासला राग अनावर झाला आणि त्याने सासूची हत्या केली.
हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी अब्बासला अटक केली आहे. एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले की, ही घटना हॉस्पिटॅलिटी हॉटेलजवळील पितळेवाडी परिसरात 2 सप्टेंबर रोजी घडली. पोलीसांनी अब्बासला ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *