दुर्दैवी घटना !!!!! लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या “या” गावातील कुटुंबावर काळाचा घाला ; अपघातात दोघे जण जागीच ठार

दुर्दैवी घटना !!!!! लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या “या” गावातील कुटुंबावर काळाचा घाला ; अपघातात दोघे जण जागीच ठार

लातुर

लातूरच्या भातांगळी पाटीजवल एक भीषण अपघात झाला आहे. लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या सहा जणांवर काळाने घाला घातला आहे. कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे.

चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीरमधील सहा जण कारने लातूरला मुलगी पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी ते लातूरपासून जवळच असलेल्या भातांगळी पाटीजवळ येताच समोरून टेम्पो भरधाव वेगात आला. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काकूर झाला.

या अपघातात समता नगरमधील रहिवासी तानाजी कुमदाळे आणि अन्य एक जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी लातूर येथील दिवगंत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे. जखमींचा प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *