दिवसाच्या प्रकशात अंधाराचा शोध !!!!! पुरंदरमधील “या” ग्रामपंचायतमध्ये विजेचा अपव्यय

दिवसाच्या प्रकशात अंधाराचा शोध !!!!! पुरंदरमधील “या” ग्रामपंचायतमध्ये विजेचा अपव्यय

पुरंदर

रात्री बंद राहणारे पथदिवे दिवसा लखलखत असल्याने रीसे ग्रामपंचायतीचे प्रशासन दिवसाच्या प्रकाशात अंधार शोधत असल्याचा प्रत्यय ग्रामस्थांना येत आहे.यामुळे विजेचा अपव्यय होत असून नागरिक मात्र आश्चर्य व्यक्त करीत आहे.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात सध्या वीज चोरी मुळे विजेचा लपंडाव सुरू आहे.अनेकवेळा नागरिकांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागते.यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.

राजेवाडी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना पुरेशी वीज मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.अशातच रिसे ग्रामपंचायतीचे प्रशासन दिवसा पथदिवे चालू ठेवून दिवसाच्या प्रकशात अंधार शोधत असल्याचे पहावयास मिळत आहे.

रिसे येथील गावठाणातील सर्वच वीज वाहक पोल वरती दिवसा लाईट सुरू आहे.अनेक पोल वरती तर दोन दोन बल्ब टाकलेले आहेत.ते देखील सुरू आहेत. यामुळे विजेचा अपव्यय होत आहे.

पथदिवे चालू बंद करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.रिसे ग्रामपंचायती कडे महावितरणची पथदिवे व इतर थकबाकी जवळपास लाखात आहे.तरी देखील दिवसा पथदिव्यांची वीज चालू ठेवण्याचे धाडस ग्रामपंचायत प्रशासन करत आहे.

याबाबत ग्रामसेवक निला चांदगुडे यांच्याशी संजीवनी न्युजने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *