तर राज्यांत पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करू- उद्धव ठाकरे

तर राज्यांत पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करू- उद्धव ठाकरे

मुंबई

राज्यांतील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.तसेच लासिकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे.असं असलं तरी करोनाचा धोका काही टळलेला नाही.त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे.शाळा,कॉलेज सुरू करण्यासाठी देखील सरकार सावध पावलं उचलत आहे.

अर्थचक्र सुरळीतपणे राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत.हे विसरू नका.नागरिकांनी कोणत्याही आमिष आणि चिथावणी यांना बळी पडू नका.स्वताच्या आरोग्याची काळजी घ्या.कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.

अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही.ते आपल्याला टाळायचं आहे.आपण जर अशा पद्धतीने गर्दी करत राहिलो तर करोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर करोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल.”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *