ग्रामपंचायतीचे राजकारण एवढे पेटले की महिला सदस्याला मारहाणीस उठले!!!!!

ग्रामपंचायतीचे राजकारण एवढे पेटले की महिला सदस्याला मारहाणीस उठले!!!!!

“या”गावात महिला सदस्यास मारहाण

हिंगोली 

“तू आमच्या गटात का येत नाहीस?” असं विचारत ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याच्या घरावर टोळक्याने हल्ला केल्याचीघटना उघडकीस आली आहे. तरुणांनी आपल्याशी छेडछाड करत मारहाण केल्याचा आरोप ज्योती पवार यांनी केलाआहे. हिंगोली तालुक्यातील खरबी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तू आमच्या गटात का येत नाहीस?” अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या तुंबळ हाणामारी  झाली.ग्रामपंचायत सदस्याज्योती पवार यांच्या घरावर टोळक्याने हल्ला केला. त्यानंतर काही तरुणांनी आपल्यासोबत छेडछाड करत मारहाणकेल्याचा आरोपही ज्योती पवार यांनी केला आहे.

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काही जणांनाही मारहाण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहेत. ही घटनाग्रामपंचायतीच्या वादातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

यामध्ये परस्पर विरोधी असे एकूण 17 जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तरतीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन आरोपींना ताब्यातघेतलं असून गावात तणाव पूर्ण शांतता असल्याचं पोलिसांनी सागितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *