आंबळे गावात आवतरले विठ्ठल-रुख्मिणी !!!!!

आंबळे गावात आवतरले विठ्ठल-रुख्मिणी !!!!!

पुरंदर

पुर्ण महाराष्ट्रात सध्या वारीचे वारे सुरु असताना या वातावरणात आंबळे गावातील श्री शिवाजी विद्यामंदिर हे मागे नाही राहु शकत हे आज शाळेने दाखवुन दिले.

शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्म व संत साहित्याचा अभ्यास व्हावा तसेच पुर्ण महाराष्ट्रातुन वारकरी हे पंढरपुरला वारीनिमित्त जातात व पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेतात हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या अनुषंगाने आज शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडीचे आयोजन केले होते.

सदर दिंडी पाहताना आंबळे ग्रामस्थांचे मन भारावुन गेले होते व ही संकल्पना आजपर्यंत या शाळेतील मुख्याध्यपकांनी कधीच राबवली नव्हती व ही संकल्पना मुख्याध्यापकांनी राबवली याबद्दल ग्रामस्थांनी मुख्याध्यापक चव्हाण यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका निना चव्हाण, शिक्षक सुनिल हैंद्रे,जितेंद्र अवताडे,श्रद्धा भट्टी,स्मिता शेळके,शरद आव्हाड,माऊली घाडगे यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *