राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे,मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही : अतुल भातखळकर

राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे,मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही : अतुल भातखळकर

मुंबई

ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंह, कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण, तसेच मोदींचे पीएमओ मधील सचिव ए.के. शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावरून राष्ट्रवादीचे नेते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत या एजन्सीमध्ये काम करणारे ते भाजपचे कार्यकर्ते होते. अशा पद्धतीने अजून बरीच कामे आहेत. या भाजप कार्यकर्त्यांबद्दल विरोधी पक्ष जे बोलत होते ते आता खरे ठरू लागले आहे, अशी टीका केली होती.

राष्ट्रवादी नेते नवाब मालिक यांनी केलेल्या त्या टिकेनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे, मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर नवाब मलिक यांच्यावर टीका करताना म्हणाले, आधी तुमच्या घरात काय सुरूय ते बघा आणि मग इतर ठिकाणी लक्ष घाला, तुमचे आमदार काय करत आहेत ते आधी बघा आणि मग भाजपवर बोलण्यासाठी तोंड उघडा, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

गेल्या काही दिवासांपासून एनसीबी आणि ईडीवरून नवाब मलिक यांनी सतत भजापवर टीका करत आहेत. यावर भाजप नेत्यांनी देखील वेळोवेळी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *