पुणे
येत्या दोन दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. अजित पवार गटानेही लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुंरदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी आगामी निवडणुकीची पुढची दिशा स्पष्ट केली.माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर गुंजवणी धरणाच पाणी आणण्यासाठी निधी मंजूर करणार. एक तर मी शब्द फार जपून देतो, दिला तर पूर्ण करतो, असं म्हणत अजित पवारांनी यावेळी भरसभेत पुरंदरकरांना मोठं आश्वासन दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याळा हजेरी लावली. यावेळी इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सभेत अजित पवारांनी जिल्हा आणि तालुक्याच्या विकासकामांवर भाष्य केलं.