मन हेलावून टाकणारी घटना!                   स्मशानभुमीच नाही ; “या” गावात रचलेल्या सरणावरचा मृतदेह पुराच्या पाण्यात गेला वाहून

मन हेलावून टाकणारी घटना! स्मशानभुमीच नाही ; “या” गावात रचलेल्या सरणावरचा मृतदेह पुराच्या पाण्यात गेला वाहून

पुणे

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहे. यातच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी चितेवर रचलेला मृतदेह पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

ही घटना पालघर जिल्ह्यातील डुकले पाडा येथे घडल्याची माहिती मिळत आहे. विष्णु शेलार यांचा मृत्यू झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह चितेवर रचलेला असताना अचानक पूर आला आणि मृतदेह वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णु शेलार यांच्यावर हात नदीजवळ अंत्यसंस्कार केले जात होते. याच नदीला अचानक पूर आल्याने त्यांचा मृतदेह वाहून गेला. यानंतर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पाड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आजही स्मशानभूमी नाही, अशी खंतही स्थानिकांनी बोलून दाखवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *