बापच ठरला मुलासाठी शाप !!!!               “या” गावात बापानं मुलाला उचलुन फरशीवर आपटलं ; अन् उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या

बापच ठरला मुलासाठी शाप !!!! “या” गावात बापानं मुलाला उचलुन फरशीवर आपटलं ; अन् उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या

सातारा

बायकोच्या चारित्र्याच्या संशय घेत सुरू असलेल्या भांडणात सांगली जिल्ह्यात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वडिलांनीच मुलाला फरशीवर आपटून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना समारे आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आयुष अर्जुन सावंत असे मृत चिमुकल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अर्जुन अनिल सावंत याच्या विरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मुलाची आई पिंकी अर्जुन सावंत यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी – अर्जुन सावंत याचा शिवाजीनगर येथील पिंकी सावंत हिच्याशी विवाह झाला होता. सध्या अर्जुन हा शिवाजीनगर येथे राहत होता.

अर्जुन याला दारूचे व्यसन असून तो वारंवार आपली पत्नी पिंकी हिच्याशी चरित्र्याचा संशय घेऊन वारंवार भांडत असे.सायंकाळी पिंकी या कामावरून घरी आल्यानंतर अर्जुन व त्यांची मुले घरी होते. अर्जुनला घरी पाहत पिंकीने कामावर का गेला नाहीस असे विचारले. त्याचा अर्जुनला राग आला.

तो घरा बाहेर निघून गेला. त्यांनतर काही काळाने दारू पिऊन तो घरी परतला. त्यानंतर पिंकी सोबत भांडायला लागला.तू चांगली नाहीस असे म्हणत त्याने पिंकीला शिवीगाळ केली. तसेच पिंकी जवळ असलेल्या आयुषला हिसकावून त्याने आपल्या जवळ घेतले. हा भांडणाचा आवाज ऐकत पिंकी याचा भाऊ व भावजय धावत घरी आल्या.

त्यांनी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु दारूच्या नशेत असलेला अर्जुनने कोणाचे काही ऐकत नव्हता. त्याने आपल्याच मुलाला फरशीवर आपटले.यामुळे चिमुकला आयुष्य रक्तबंबाळ झाला. त्याला कुटुंबियांनी तातडीने सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान उपचार सुरु असताना आयुषचा मृत्यू झाला. या घटनेचा पिंकीला मोठा धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *