गराडे
पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या केतकावळे जवळील देवडी गावच्या हद्दीत चिव्हेवाडी घाटात एका वळणावर व्हॅगनार गाडी वर ट्रक पलटी झाल्याने व्हॅगनार मधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
सासवड वरून कापुरव्होळ कडे जाताना नारायणपूर वरून पुढे जाताना पुरंदरच्या पायथ्याशी असणाऱ्या चिव्हेवाडी घाटात वारंवार अपघात होत असतात. शासनाचे या रस्त्याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे.
हा रस्ता कायमस्वरूपी मृत्यूचा सापळा होत असून बरेचश्या प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याची निदर्शनास आले आहे.
आज ट्रक सासवड वरून कापुरव्होळला जात असताना कापुरव्होळ कडुन सासवड कडे येत असणाऱ्या व्हॅगनार गाडी वर देवडी गावच्या हद्दीत वळणावर ट्रक पलटी झाला असून त्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूंमध्ये गणेश उर्फ बाळ लोकावळे वय 28 राहणार किकवी तर सासवडला येणारी सुपे गावची तृप्ती अक्षय जगताप वय 26 ही मयत झाली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे ए एस आय डी एल माने करीत आहेत.