धक्कादायक !!!! कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या सहा वारकऱ्यांना “या” गावात वाहनाने चिरडले

धक्कादायक !!!! कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या सहा वारकऱ्यांना “या” गावात वाहनाने चिरडले

सोलापुर

सोलापूरमधून धक्कायक वृत्त समोर आलं आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे. हा अपघात सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जुनोनी गावा जवळ घडला.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सोलापूरमध्ये मोठा अपघात घडला आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे.

सदर अपघात हा सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ घडला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार महिला आणि दोन पुरूषाचा सामावेश आहे. सदर अपघात सहा जण जखमी झाले आहेत.

अपघाताची खबर मिळताच सांगोला पोलीस हे घटनास्थळी पोचले आहेत.या अपघातात शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार, सर्जेराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *