एकाच गावात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल झालेल्या वायरमनच्या बदल्या त्वरीत करा अन्यथा आंदोलन:महेश राऊत

एकाच गावात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल झालेल्या वायरमनच्या बदल्या त्वरीत करा अन्यथा आंदोलन:महेश राऊत

सासवड

पुरंदर तालुक्यातील महावितरणच्या वायरमनची ज्या गावात तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झाली आहे,अशा सर्व वायरमनची बदली तातडीने करावी अशा मागणीचे पत्र वीर-भिवडी गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सासवड विभाग यांना दिले आहे.

ज्या वायरमनांचे तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल एकाच गावात झाला आहे त्या गावांमध्ये वीज चोरीचे प्रमाण खुप जास्त आहे.तसेच महामंडळाच्या विज बिलांच्या थकबाकीचे प्रमाणदेखील खुप मोठ्या प्रमाणावर असल्याचे पहावयास मिळत आहे.

म्हणुन सदर वायरमन यांच्या बदल्या आपणाकडुन त्वरीत करण्यात याव्यात अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा महेश राऊत यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *