पुरंदर पुरंदर तालुक्यातील रिसे,पिसे,राजुरी,नायगाव, पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी,चांदगुडेवाडी,आंबी खुर्द यापरिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.पणत्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.यासाठी नायगावयेथे ग्रामस्थांची बैठक (शनिवार दि २६/०६/२०२१)संपन्न झाली. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या भागात विमानतळहोण्यास तीव्र विरोध दर्शविला. व एक इंचही जमीन विमानतळाला द्यायची नाही असा उपस्थितांच्या वतीने ठराव करण्यातआला. यावेळी बोलताना सरपंच हरिदास खेसे म्हणाले आमच्या जमिनी बागायती असताना जिरायती का दाखविल्या.पुढील विरोध कसा करायचा.मोर्चा,आंदोलन यासाठीआपण सर्वांनी पुढील दिशा ठरवायची आहे. अनिल शेंडगे म्हणाले पारगाव मध्ये जसा विरोध होता तसा विरोध आपण करूया.मोठ्या प्रमाणात विरोधकरूया.बागायती क्षेत्र वाढले आहे. चंद्रकांत चौंडकर म्हणाले विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घ्या. महेश कड म्हणाले विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे.शेवट पर्यंत विमानतळालाआमचा विरोध आहे. महेंद्र खेसे म्हणाले विमानतळ आपल्याला गावात नको व इतर गावात नको.आपले क्षेत्र जिरायती दाखवले आहे तेबागायती आहे.शासनाला खोटी माहिती देण्यात आली आहे. बाळासाहेब कड म्हणाले पुरंदर उपसा व जनाई उपसा सिंचन योजनेमुळे आपला भाग सदन झाला आहे.सर्व पक्षीय जोडेबाजूला ठेऊन विमानतळाचे भूत हटऊया.शेतकरी पुत्र म्हणून माझा कायम विरोध आहे.आमदार सुध्दा शेतकऱ्यांच्या बरोबरआहेत.टॅक्टर मोर्चे काढुया. प्रदिप खेसे म्हणाले आमदारांनी विश्वासात घेतले नाही.राजकीय हित संबंध जोपासले.मी शेवटच्या घटकापर्यंतविमानतळाला विरोध करणार आहे. सदाशिव चौंडकर म्हणाले पारगाव,चाकण येथील लोकांनी विरोध केला विमानतळ हाटले.त्यामुळे आपणही विरोध करूनविमानतळ हाटऊया.गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे.आमदारांना विरोधाचा ठराव देऊ. बारीकराव खेसे म्हणाले विमानतळ होऊच नये.आपल्या जमिनी कसल्याही परिस्थितीत द्यायच्या नाहीत.जमिनीच्या गटप्रमाणे शेतकऱ्यांनी सह्या घ्या. यशवंत कड म्हणाले आम्हाला परदेशात जायचे नाही.आम्हाला विमानतळ नको.आमदार, खासदार,पवार साहेब आपल्याविरोधात जाणार नाही. जन्मभूमी, मातृभूमी सोडायची नाही. विलास खेसे म्हणाले नायगावमधली इंच भरही जमीन आम्ही देणार नाही असा सर्वानुमते ठराव करूयात. यावेळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळ : नायगाव(ता.पुरंदर) येथे आपले विचार मांडताना विलास खेसे व इतर
Maharashtra City: पुणे
आंबळे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातुन होतेय कौतुक.. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना अखेर यश
पुरंदर: पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत दुरावस्थेत होती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे श्रीमती विजया दरेकर मेमोरियल हॉस्पिटल ची इमारत नाममात्र
खासदारांनी स्वीकारले पालकत्व
पुरंदर जेजुरी येथील सुरज व दुर्गा घोणे या दांपत्याचे कोरोनामुळे निधन झाले.आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या त्यांच्या दोन्हीमुलांचे (वय वर्षे ४ व दीड) पालकत्व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या
पुरंदर तालुक्यात गुंजवणी पाईपलाईनचे काम सुरू झाल्याने, गुंजवणी स्वप्नपुर्तीकडे
प्रत्येक्ष काम सुरू झाल्याने शेतकरी आनंदी पुरंदर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गुंजवणी प्रकल्पाचे काम भोर वेल्ह्यात सुरू केल्यानंतरआता पुरंदर तालुक्यातही पाईपलाईनचे
वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर महिलांच्या हस्ते वृक्षारोपण. राष्ट्रतेज प्रतिष्ठानचा माळशिरसमध्ये स्तुत्य उपक्रम
पुरंदर पुरंदरच्या पूर्व भागातील माळशिरस गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या वतीने वटपौर्णिमेचे औचित्य साधत महिलांच्या हस्ते माळशिरस गावातील महादेव मंदिर परिसरात वड, पिंपळ,
वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर महिलांची कोविड चाचणी
मावळ पवन मावळ मधील मोर्वे गावात येळशे प्राथमिक आरोग्य केंद्र व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वटपौर्णिमेचा सुवर्ण मुहूर्तसाधत गावातील महिलांची कोविड टेस्ट करण्यात आली. शहरी
आढावा बैठक संपन्न
पुरंदर जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती पुरंदर यांच्या वतीने माळशिरस व बेलसर जिल्हा परिषद गट प्रभाग समितीची विकास कामांचा आढावा मिटीऺग मौजे शिवरी गावी,
डिवीजनल मँनेजर यांना दिले निवेदन
दौंड: संसद रत्न खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांनी मागील आठवड्यात दौंड रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुरू असलेल्या विविधविकास कामांची पाहणी केली होती कुरकुंभ मोरी
तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी मंगेश गायकवाड यांची निवड
पुणे : पुरंदर तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी आंबळे गावचे मा. सरपंच मंगेशगायकवाड यांची निवड करण्यात आली आहे नुकतेच निवडीचे पत्र आंबळे
शेत दोघांचे अभियान
पुणे पुरंदर: लक्ष्मी मुक्ती योजने द्वारे महिलांचे नाव शेतीवर लावण्यासाठी मासुम संस्था पुरंदर तालुक्यातील ४० गावांमध्येअभियान राबवित आहे. या अभियानाला कालपासून सुरुवात झाली आहे.समाजात व