निरा छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार अभिमानाने जनतेने या चौकाला नाव दिले. परंतु त्याचे पावित्र्य राखलेजात नाही. या चौकात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम होतात. देशावर कोणतेही संकटआले तरी जनता न सांगता या चौकात धावून येते. परंतु महाराजांचे विषयी अभिमान असणार्या या चौकात महाराजांचे नावाचा साधा नाम फलक सुद्धा नाही. त्यातचवाढदिवस, पदावरील निवड, भावपूर्ण श्रद्धांजली आणि जाहिराती चे फलक कायम लागलेले असतात. त्यामुळे या चौकाचेनाव बदलले जाते की काय याची भीती वाटायला लागलेली आहे. कोरोना महा मारीत अनेक भावपूर्ण श्रद्धांजली चे फलकपाहावे लागत असलेने प्रवाशावर व जनतेवर दडपण येत होते. आजार कमी होण्याऐवजी बळावले जात होते. वाढदिवस वपदावरील निवड हे फलक तर कायमच. आशा फलकामुळे रहदारीस अडथळा येत आहे व त्यांच्याकडे पाहता पाहताअपघात होत आहेत. गावाचे भूषण असलेला चौक परंतु लोक चौकाचे कडेला उघड्यावरच लघुशंका करीत आहेत. अशा फलकांना पोलीस व ग्रामपंचायत परवान्याची आवश्यकता असते. या पूर्वीचे पोलीस अधिकारी श्री. अंकुश मानेयांनी कडक नियम राबवले होते. त्यामुळे बेकायदेशीर फलकावर अंकुश होता. ग्रामपंचायतीला हे एक उत्पन्नवाढीचेसाधन आहे परंतु याबाबत त्यांची उदासीनता दिसून येते. दुखवायचे कोणाला. वाल्हे येथील एका सुशिक्षित नेत्याने व बारामती तालुक्यात प्रत्येक ठिकाणी महिला नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त असेफलक न लावता जनतेच्या कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले परंतु येथे असे झालेले दिसून येत नाही. जनता राम भरोसेकोणाचे कोणाला सोयरसुतक नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार बाबत उदासीन राज्यकर्ते काही करत नसतील तर महाराजांचे व गावाविषयी अभिमान असणारे एक संघटन स्वच्छ नीरा सुंदर निरा या तत्त्वाप्रमाणे चौकाचे सुशोभिकरण करणार आहे?
Maharashtra City: पुणे
प्रस्तावित विमानतळ विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा बडगा. रोमणवाडीतील ४४१ ग्रामस्थांनी नोंदवल्या स्वाक्षऱ्या.
पुणे पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.विरोधाची धार अधिक तीव्र करण्यासाठी रोमणवाडी ग्रामस्थांनी विमानतळ विरोधी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. एकाच दिवसात
पिंगोरीतील मोबाईल नेटवर्क प्रकरणी दत्ताञय फडतरे यांच्या मागणीची राज्यशासनाकडुन दखल
पुणे (प्रतिनिधी ).पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणुन ओळखल्या जाणार्या पिंगोरी गावात कोणत्याही मोबाईल कंपन्यांचे टाॅवर व नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय दुर करण्याची मागणी दत्ताञय फडतरे
माळशिरसच्या उपसरपंचपदी गोकुळ यादव बिनविरोध
पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील राजकीयदृष्ट्या सर्वात मोठी असणार्या माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्यानिवडणुकीत गोकुळ बबन यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माळशिरसचे उपसरपंच नंदा गायकवाड यांचा एक वर्षाचा कार्येकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हीनिवडणुक घेण्यात आली. सकाळी आकरा वाजता गोकुळ यादव यांनी आपला उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. बारा वाजेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनीउपसरपंचपदी गोकुळ यादव यांची बिनविरोध निवड केली. सचिव म्हणुन माळशिरसचे ग्रामसेवक सोनाली पवार यांनीकाम पाहीले. यावेळी सरपंच महादेव बोरावके,उपसरपंच गोकुळ यादव, माजी उपसरपंच नंदा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य मोहनयादव,माऊली यादव ,राजेंद्र गद्रे,दत्तात्रय डोंबाळे ,अनिसा शेख ,राणी यादव,सारिका यादव,पुष्पा ताम्हाणे,रुपाली गुरवपरिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विमानतळाची जागा अजुन फिक्स नाही -शरद पवार
पुणे पुरंदर येथिल नवीन विमानतळ प्रस्तावित गावांमधील विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या लोकांनी पवार साहेबांची भेटघेतली. यावेळी पवार साहेबांना नवीन जागे विषयी प्राप्त केलेली माहिती देण्यात
सुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार
बारामती प्रतिनिधी कल्पना जाधव बारामती अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था मार्फत राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार जिजाऊ पुण्यतिथी च्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले राजमाता जिजाऊच्या आदर्शवत संस्कारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांनी समाजाला दिशा देणारा इतिहास घडविला अन्याय अत्याचारविरोधात लढण्याची जिद्द महाराष्ट्र भूमीतनिर्माण केली त्यांच्या आद्यरर्शामुळे शिवरायांनी आदर्श महाराष्ट्र घडविला स्वराजाचे तोरण बांधून रयतेची सेवा केलीअशा शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेउन समाजात निःस्वार्थपणे कामकेल्यामुळे नाशिक येथील सामाजिक कार्यकत्या अखिल भारतीय मराठा युवती महासंघ च्या जिल्हा संपर्क प्रमुख सुचिताजाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेतून समाजाची सेवा करीत आहेत या पुढे समजतील गोरगरीब लोकांसाठीकार्यरत राहणार असे पुरस्कार्थी सुचिता जाधव यांनी सांगितले
सुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार
बारामती प्रतिनिधी कल्पना जाधव बारामती अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था मार्फत राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार जिजाऊ पुण्यतिथी च्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले राजमाता जिजाऊच्या आदर्शवत संस्कारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांनी समाजाला दिशा देणारा इतिहास घडविला अन्याय अत्याचारविरोधात लढण्याची जिद्द महाराष्ट्र भूमीतनिर्माण केली त्यांच्या आद्यरर्शामुळे शिवरायांनी आदर्श महाराष्ट्र घडविला स्वराजाचे तोरण बांधून रयतेची सेवा केलीअशा शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेउन समाजात निःस्वार्थपणे कामकेल्यामुळे नाशिक येथील सामाजिक कार्यकत्या अखिल भारतीय मराठा युवती महासंघ च्या जिल्हा संपर्क प्रमुख सुचिताजाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेतून समाजाची सेवा करीत आहेत या पुढे समजतील गोरगरीब लोकांसाठीकार्यरत राहणार असे पुरस्कार्थी सुचिता जाधव यांनी सांगितले
रुग्ण हक्क परिषदेच्या यशस्विनी नवघणे आणि सुरेखा कुसाळकर यांना पुरस्कार प्रदान
पुणे ज्यावेळी लोक घरातून बाहेर पडण्यासाठी भीत होते, त्याकाळी आपल्या ओळखीच्याही नसलेल्या रुग्णांची मदत करायलाजे मोजके कार्यकर्ते बाहेर पडून अहोरात्र मदत करीत होते, त्यातील प्रमुख नावे म्हणून रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहरउपाध्यक्ष यशस्वीनी नवघणे आणि संघटक सुरेखाताई कुसाळकर यांचा परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यातआला. शाल, साडीचोळी आणि पुष्पगुच्छ देऊन दोघी रणरागिणीचा सत्कार करण्यात आला. या समारंभाचे आयोजन रूग्णहक्क परिषदेच्या पुणे शहर कार्याध्यक्ष अपर्णा साठे यांनी केले. कोंढवा आरएचपी हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेशचव्हाण, विद्या चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफभाई तारकश, हाफिज शेख, रुग्णहक्क परिषदेच्या सोशल मीडियाप्रमुख वनिता पंडित उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय सचिव संजय जोशी यांनी तर सूत्रसंचालन गणेश भोईटे यांनी केले. राष्ट्रवादीकाँग्रेसचे असिफ पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुणे शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तक्रार दाखल
पुणे भारती विद्यापीठ कात्रज येथील कॅम्पस मध्ये स्टाफ महिला डॉक्टरांच्या क्वार्टर रूम व बाथरूम मध्ये कॅमेरे सापडल्याच्याविरोधामध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शिवसेना पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने शहर संघटिका सौसविताताई मते यांच्या मार्गदर्शनाने तीव्र निषेध व्यक्त करत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. संबंधित घटनेत दोषी असलेल्या व्यक्तींना तातडीने अटक करावी सर्व महिला स्टाफ क्वार्टर मध्ये कॅमेऱ्यांविषयी चेकिंगव्हावे,कॅम्पस मधील महिलांना पुरेशी सुरक्षा मिळावी अशा मागण्या या अर्जाद्वारे करण्यात आल्या. यावेळी शिवसेनामहिला आघाडीच्या नेहा कुलकर्णी , प्रांजल झगडे , सायली शेडगे , नेहा नाईक , मनीषा जरे , प्रीती कारंजकर , गौरीढमाले आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका स्थगीत
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका व डेल्टा प्लसचा धोका पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणार्या पोटनिवडणुका स्थगीत करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे.