नीरा येथे एकाचा गोळी घालून खून

नीरा                         नीरा(ता.पुरंदर) येथील कुप्रसिद्ध गुंड  गणेश विठ्ठल रासकर ( वय- ४१)  यांच्यावर अज्ञाताने शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबारकेला. या गोळीबारात गुंड गणेश रासकर यांचा मृत्यू झाला.            घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,शुक्रवारी (दि.१६) सात वाजण्याच्या सुमारास पुणे -पंढरपुर यापालखी मार्गावर रेल्वे स्टेशनसमोरील एका दुकानाजवळ गुंड गणेश रासकर पल्सर गाडीवर आला होता. त्यावेळीअज्ञातांनी गणेश रासकर याच्यावर पाठीमागून गोळी झाडली असता ती गोळी पुढे निघाली. त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापुर्वीच तो मृत्यूमुखी पडला असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनीघोषित केले.

Read More

पुरंदर तालुक्यात आज ५२ जण कोरोना पॉझीटीव

सासवड पुरंदर तालुक्यामध्ये आज केलेल्या एकुण ५४२ संशयीत रुग्णांच्या तपासणीमध्ये तब्बल ५२ रुग्णांचा अहवाल हा कोरोणा पॉझीटीव आला आहे. पुरंदर तालुक्यामध्ये आज ३९ रुग्ण बरे

Read More

वीजबिल न भरल्यास महावितरण वायरसह मीटरही काढणार

मुख्य अभियंता सुनील पावडे यांचे निर्देश बारामती वारंवार संधी देऊनही वीजबिल भरण्यास कानाडोळा करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कठोर कारवाई सुरु केली आहे. जुलै अखेर मुख्यालयाने दिलेले १८१३ कोटी रुपयांच्या वसूलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून, थकबाकीदारांचे मीटर-वायर काढून आणण्याचे आदेश बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील अभियंत्यांना आढावा बैठकीत दिले आहेत. कारवाई टाळायची असेल तर तातडीने थकीतवीजबिल भरुन सहकार्य करण्याचे आवाहनही पावडे यांनी केले आहे. कोरोना महामारीत अखंड वीज देऊनही ग्राहकांनी वीजबिल भरण्यास हात आखडता घेतल्याने महावितरणची आर्थिकस्थिती दोलायमान झाली आहे. दरमहाच्या वीज खरेदी व कर्मचाऱ्यांचा पगारासह वितरणाचा खर्च भागवणेही अशक्यझाल्याने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यभरात कठोरवसुली मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांच्यामार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी प्रत्येक विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. ही पथकेवीजबिल वसूलीसोबत वीजचोरांवर कारवाई करणार आहेत. उद्दिष्टपूर्ती न करता कामात कुचराई करणाऱ्या अधिकारीकर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बारामती परिमंडलाची वीजबिल थकबाकी सहा हजार कोटींच्या पुढे गेली आहे. गेली वर्षभरापासून वीजबिल न भरणाऱ्याघरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ९० हजार ९४८ ग्राहकांकडे ६४ कोटी ४९ लाख थकबाकी आहे. यातलाखांहून अधिक थकबाकी असलेले ८३९ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १९ कोटींहून अधिक थकले आहेत. त्यांचेवर तात्काळकारवाई केली जात आहे.  कृषीपंप ग्राहकांना त्यांचे वीजबिल भरणे सुलभ व्हावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी ‘कृषी ऊर्जा अभियाना’च्या माध्यमातूनसवलत देणारी योजना आणली आहे. यामध्ये किमान ५० टक्के ते ६६ टक्के माफी मिळते. योजनेत परिमंडलाने ४२०कोटींची वसूली केली आहे. ७५ हजार ७८५ शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के १२३.९२ अधिक चालूबिलापोटी ३४.२९ कोटी रुपये भरले आहेत. त्यांचे १२३.९२ कोटी माफ झाले आहेत. तर बहुतांश अंशत: थकबाकी भरुनसहभाग नोंदवला आहे. त्यांनी उर्वरित रक्कम भरणे गरजचे आहे. ५० टक्के सवलत योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ असलीतरी सर्व शेतकरी ग्राहकांनी सप्टेंबर २०२० पासूनची सर्व त्रैमासिक चालू बिले भरणे अनिवार्य असून, जे भरणार नाहीतत्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही सर्व अभियंत्यांना दिलेले आहेत.

Read More

शंभर तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या

सासवड पोलीस स्टेशनची नेत्रदीपक कामगिरी, खून खटल्यातील आरोपीला नेपाळमध्ये केलेजेरबंद. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या टिमचे सर्वत्र कौतुक, सासवड  दिनांक ९/७/२०२१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोनोरी रस्त्यावर बोरकर वस्ती लगत एका नाल्याच्याठिकाणी भगवान मारकड याच्या मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात घातक शस्त्राने वार करून त्यांची हत्याकरण्यात आली होती. मयत भगवान मारकड  यांच्या पत्नी छाया भगवान मारकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवडपोलीस स्टेशन येथे दिनांक  ९/७/२१ रोजी खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला होता.सदरगुन्ह्याचा           तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत  होते. हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यानेघटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेटदेऊन पोलिसांना त्वरित गुन्हा उघड करण्याबाबत आदेश दिले होते.         भगवान मारकड हा सोनोरी रोडवरील एका रिमोल्डिंग टायर च्या दुकानात मजुरी ने काम करीत होता. त्याला दारू पिण्याचेव्यसन होते. तो नेहमी दारू पीत होता. दारू पिण्या मध्ये भांडणे होऊन त्याचा खून झाला असावा असा पोलिसांना संशयवाटत होता. ज्या ठिकाणी प्रेत सापडले होते तेथून जवळच असलेल्या सचिन बोरकर यांच्या घरामध्ये नेपाळी इसमसासवडमध्ये फर्निचर चे काम करीत होता, तो भाड्याने राहत होता. तो इसम गुन्हा झाल्यापासून गायब असल्याचेपोलिसांना समजले. तो धागा पकडून त्याचे व भगवान मारकड  यांचे काही संबंध होते का याबाबत पोलिसांनी तपासकेला. यावेळी अशी माहिती मिळाली की हे दोघे जण दारू पीत होते. पार्टी करीत असायचे. घटनेच्या आदल्या दिवशी मयत भगवान व संशयित फर्निचरचे काम करणारा नेपाळी इसम निरंजन सहानी याने सायंकाळी८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या रूमवर दारू मटण पार्टी केली. पार्टी सुरू असताना दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरूनबोलाचाली वरून वाद निर्माण झाला. व निरंजन साहानी याने लाकडी दांडक्याने भगवान मारकड याच्या डोक्यात मारहाणकेली. भगवान मारकड यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. व रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा मृत्यू झाला.            मृत्यू नंतर निरंजन याने त्याचे प्रेत ओडत कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी, नाल्यां मध्ये फेकून दिले. व रात्रीमोटरसायकलने नेपाळ कडे रवाना झाला.          सासवड पोलिसांनी संशयित आरोपीला माहिती मिळताच त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, व्हि टी भोर , निलेश जाधव असे पथक नेपाळ करता रवाना झाले. नेपाळ बॉर्डरवर पोहोचण्या पूर्वी आरोपी हा घरी नेपाळ येथे पोचलाहोता. नेपाळमध्ये जाऊन आरोपीला अटक करून शकत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी खूप तांत्रिक अडचणीआल्या होत्या. स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते.  अशा वेळी मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर तुषार यांनी अतिशय मोलाचे तांत्रिक मदत केली. सहाय्यक पोलीसनिरीक्षक राहुल घुगे यांनी आपल्या कौशल्य व अनुभव पणाला लावून आरोपीला नेपाळ बॉर्डरवर अत्यंत चलाखीने ताब्यातघेतले. व सासवड स्टेशन येथे आणले. 

Read More

नावाचे पावित्र का राखले जाते का?

निरा छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार अभिमानाने जनतेने या चौकाला नाव दिले. परंतु त्याचे पावित्र्य राखलेजात नाही.  या चौकात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम होतात. देशावर कोणतेही संकटआले तरी जनता न सांगता या चौकात धावून येते. परंतु महाराजांचे विषयी अभिमान असणार्‍या या चौकात महाराजांचे नावाचा साधा नाम फलक सुद्धा नाही. त्यातचवाढदिवस, पदावरील निवड, भावपूर्ण श्रद्धांजली आणि जाहिराती चे फलक कायम लागलेले असतात. त्यामुळे या चौकाचेनाव बदलले जाते की काय याची भीती वाटायला लागलेली आहे. कोरोना महा मारीत अनेक भावपूर्ण श्रद्धांजली चे फलकपाहावे लागत असलेने प्रवाशावर व जनतेवर दडपण येत होते. आजार कमी होण्याऐवजी बळावले जात होते. वाढदिवस वपदावरील निवड हे फलक तर कायमच. आशा फलकामुळे रहदारीस अडथळा येत आहे व त्यांच्याकडे पाहता पाहताअपघात होत आहेत. गावाचे भूषण असलेला चौक परंतु लोक चौकाचे कडेला उघड्यावरच लघुशंका करीत आहेत. अशा फलकांना पोलीस व ग्रामपंचायत परवान्याची आवश्यकता असते. या पूर्वीचे पोलीस अधिकारी श्री. अंकुश मानेयांनी कडक नियम राबवले होते. त्यामुळे बेकायदेशीर फलकावर अंकुश होता.  ग्रामपंचायतीला हे एक उत्पन्नवाढीचेसाधन आहे परंतु याबाबत त्यांची उदासीनता दिसून येते. दुखवायचे कोणाला. वाल्हे येथील एका सुशिक्षित नेत्याने व बारामती तालुक्यात प्रत्येक ठिकाणी महिला नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त असेफलक न लावता जनतेच्या कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले परंतु येथे असे झालेले दिसून येत नाही. जनता राम भरोसेकोणाचे कोणाला सोयरसुतक नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक निरा शिवतक्रार बाबत उदासीन राज्यकर्ते काही करत नसतील तर महाराजांचे व गावाविषयी अभिमान असणारे एक संघटन स्वच्छ नीरा सुंदर निरा या तत्त्वाप्रमाणे चौकाचे सुशोभिकरण करणार आहे?

Read More

प्रस्तावित विमानतळ विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा बडगा. रोमणवाडीतील ४४१ ग्रामस्थांनी नोंदवल्या स्वाक्षऱ्या.

पुणे पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.विरोधाची धार अधिक तीव्र करण्यासाठी रोमणवाडी ग्रामस्थांनी विमानतळ विरोधी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. एकाच दिवसात

Read More

पिंगोरीतील मोबाईल नेटवर्क प्रकरणी दत्ताञय फडतरे यांच्या मागणीची राज्यशासनाकडुन दखल

पुणे (प्रतिनिधी ).पुरंदर तालुक्यातील  सैनिकांचे गाव म्हणुन ओळखल्या जाणार्या पिंगोरी  गावात कोणत्याही मोबाईल कंपन्यांचे टाॅवर  व नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय दुर करण्याची मागणी दत्ताञय फडतरे

Read More

माळशिरसच्या उपसरपंचपदी गोकुळ यादव बिनविरोध 

पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील राजकीयदृष्ट्या सर्वात मोठी असणार्या माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्यानिवडणुकीत गोकुळ बबन यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       माळशिरसचे उपसरपंच नंदा गायकवाड यांचा एक वर्षाचा कार्येकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हीनिवडणुक घेण्यात आली. सकाळी आकरा वाजता गोकुळ यादव यांनी आपला उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. बारा वाजेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने  निवडणुक  निर्णय अधिकारी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनीउपसरपंचपदी गोकुळ यादव यांची बिनविरोध निवड केली. सचिव म्हणुन माळशिरसचे ग्रामसेवक सोनाली पवार यांनीकाम पाहीले. यावेळी सरपंच महादेव बोरावके,उपसरपंच गोकुळ यादव, माजी उपसरपंच नंदा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य मोहनयादव,माऊली यादव ,राजेंद्र गद्रे,दत्तात्रय डोंबाळे ,अनिसा शेख ,राणी यादव,सारिका यादव,पुष्पा ताम्हाणे,रुपाली गुरवपरिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

विमानतळाची जागा अजुन फिक्स नाही -शरद पवार

पुणे  पुरंदर येथिल नवीन विमानतळ प्रस्तावित गावांमधील विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या लोकांनी पवार साहेबांची भेटघेतली. यावेळी पवार साहेबांना नवीन जागे विषयी प्राप्त केलेली माहिती देण्यात

Read More

सुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार

बारामती  प्रतिनिधी कल्पना जाधव बारामती अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था मार्फत राजमाता जिजाऊ रत्न  पुरस्कार  जिजाऊ पुण्यतिथी च्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले राजमाता जिजाऊच्या आदर्शवत संस्कारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांनी समाजाला  दिशा देणारा इतिहास घडविला अन्याय अत्याचारविरोधात लढण्याची जिद्द महाराष्ट्र भूमीतनिर्माण केली त्यांच्या आद्यरर्शामुळे    शिवरायांनी आदर्श  महाराष्ट्र घडविला स्वराजाचे तोरण बांधून रयतेची सेवा केलीअशा शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेउन समाजात निःस्वार्थपणे कामकेल्यामुळे नाशिक येथील सामाजिक कार्यकत्या अखिल भारतीय मराठा युवती महासंघ च्या जिल्हा संपर्क प्रमुख  सुचिताजाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले  आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेतून समाजाची सेवा करीत आहेत या पुढे समजतील गोरगरीब लोकांसाठीकार्यरत राहणार असे पुरस्कार्थी सुचिता जाधव  यांनी सांगितले

Read More