पुरंदर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीआयोजित अजित स्वाभिमान सप्ताह दुसरा दिवस सासवड शहरातील पुरंदर हायस्कूल, वाघिरे हायस्कूल, कन्याप्रशाला,शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल,गुरुकुल विद्यालयातील दहावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंतविद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान सोहळा कार्यक्रम मा.माणिकराव झेंडे पाटील अध्यक्षपुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी करोनाच्या या कसोटीच्या काळात चांगल्यप्रकारे आभास करून उज्वल यश संपादन केले.सासवड व पुरंदरतालुक्यातील मुले अभ्यासात कमी पडत नाही आज निकाल पाहता सर्व प्रथम तीन क्रमांक हे मुलींनीच पटकावले याचामुलांनी विचार करावा लागेल. त्याचबरोबर मुलींना शिक्षणात काही अडचण आल्यास त्यांना योग्य ती मदत केली जाईलअसे यावेळी बोलताना झेंडे पाटील म्हणाले . शाळेतील काही गरीबमुलांना ऑनलाइन साठी मोबाईल ची गरज आहे अशी सूचना शिक्षिका सौ.संगीता रिकामे यांनीकेली.गरजू मुलांना मोबाईल किंवा टॅब देण्याची व्यवस्था स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान मार्फत केली जाईल असेसंतोष जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले.सदर प्रसंगी बंडूकाका जगताप कलाताई फडतरे यांनी मनोगत व्यक्तकेले प्राचार्य हनिफ मुजावरव शिक्षिका सौ.संगीता रिकामे यांनी सत्काराला व विद्यार्थ्यांन मधून जगताप हिने सत्कारालाउत्तर दिले. सदर प्रसंगी नगरसेविका मंगलनानी म्हेत्रे,माजी नगराध्यश्या कलाताई फडतरे, संतोष जगताप,बंडुकाका जगताप, सयाजीवांढेकर,धनंजय जगताप,अमोल शिंदे,मनीष रणपिसे,अतुल जगताप,चेतन जाधवराव, निता सुभागडे,कुमुदिनी पांढरे,तृप्तीशिंदे इ.उपस्थित होते अतुल जगताप यांनी आभार मानले.
Maharashtra City: पुणे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार विलास चाफेकर यांचे निधन
पुणे वंचित विकास, जाणीव संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे विचारवंत विलास चाफेकर सर यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही
अबब! गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली
महाराष्ट राज्यात सध्या सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाला आहे. अनेक भागांत दरडकोसळून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तर पुरामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यातकोकण रेल्वे मार्गावरही दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. गोव्यामध्ये मंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेनवरमोठी दरड कोसळली आहे. यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली ही ट्रेन गेली अनेक तास अडकून पडली आहे. याअपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना कुलेम येथे माघारी धाडण्यात आले आहे. कर्नाटकमधील मंगळूरहून मुंबईकडे येणारी ही गाडी शुक्रवारी अपघातग्रस्त झालीय. या घटनेचा एक व्हिडिओ आतासमोर येत आहे. ही ट्रेन दुधसागर– सोनोलिम विभागादरम्यान रेल्वे रुळावरून खाली उतरली अशी माहिती समोर येतआहे. ०११३४ मंगळूर जंक्शन–सीएसएमटी एक्स्प्रेस ही ट्रेन अपघातग्रस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोविशेषबाब म्हणजे चिपळूणमधील पुरामुळे या रेल्वे मार्गात बदल करुन ती मडगाव–मिरजमार्गे वळवण्यात आली होती. . दुधसागर आणि सोनोलिम स्टेशनांदरम्यान आणि करंजोल व दुधसागर स्टेशनांदरम्यान दक्षिण–पश्चिम रेल्वेच्या हुबळीविभागादरम्यानच्या घाट विभागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठा मातीचा मोठा ढिगारा रुळावरकोसळला. सध्या या भागात वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय ०२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्स्प्रेसचासुद्धा रद्द झालेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. बुधवारीदिल्ली येथून मार्गत स्त झालेल्या या ट्रेनला लौंडा आणि वास्कोदरम्यान अंशत: रद्द करण्यात आले आहे. तसेच ट्रेननंबर ०८०४८ वास्को द गामा–हावडा एक्स्प्रेस, ०७४२० वास्को द गामा–तिरुपती एक्स्प्रेस आणि ०७४२०/७०२२ वास्कोद गामा तिरुपती हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. मात्र याचा मोठा फटका आता कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे.
वीर धरणातुन निरा नदीपात्रात २१ हजार ५०५क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग:निरा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा
पुरंदर पुरंदर तालुक्यातील वीर येथील धरणक्षेत्रात गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याचीआवक वाढत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातुन रात्री आठ वाजता ८०० क्युसेक्सवेगाने निरा नदीपात्रात विसर्ग सुरु झाला होता.शनिवारी पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्गसुरु आहे. वीर धरण विद्युत गृहातुन रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक्स वेगाने निरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.रात्री१२:३० वाजता धरणाच्या सांडव्यातुन ४,६३७ क्युसेक्स वेगाने तर पहाटे २:०० वाजता विसर्गाचा वेग वाढवुन १२,४०८क्युसेक्स तर पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गाच्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो व याकाळात नदीकाठच्या रहिवाशांनी काळजीघ्यावी,निरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन निरा पाठबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे.
तालुकास्तरीय शासकीय विद्युत वितरण समिती सदस्यपदी मनोहर कुंजीर
पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील वाघापुर गावचे प्रगतशील बागायतदार व युवा उद्योजक मनोहर कुंजीर यांची पुरंदर तालुका शासकीय विद्युत वितरण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली
महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद पुरंदरच्या अध्यक्षपदी विनय गुरव, उपाध्यक्षपदी आसिफ मुजावर, सचिवपदी स्वप्निल कांबळे तर कार्यकारिणी सदस्यपदी मंगेश गायकवाड
गुरुपौर्णिमे निम्मीत एस.एम.देशमुखांच्यावर पुष्पवृष्टी पुरंदर :पत्रकारीतेत युट्युब व वेब पोर्टेला वेगळे महत्व आले आहे. या सोशल मिडीयात काम करणाऱ्या युवा पत्रकारांना संघटनेत सामावून घेण्यासाठी राज्यभरात
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दौंडज मधील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स पुस्तकांचे वाटप
पुरंदर दौंडज येथील भारती विद्यापीठाचे, शिक्षण महर्षि डाॅ. पतंगराव कदम विद्यालय, दौंडज मध्ये महाराष्ट्र राज्याचेउपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अजिंक्य भैय्या टेकवडे युवा मंच दौंडजयांचे तर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स च्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. ऑन लाईन शिक्षणासाठी या गावातील ब-याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण घेण्यामध्ये खूपअडचणी येत आहेत या बाबत पालकांकडून सूचना येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन या गावातील माजी विद्यार्थ्यांनीएकत्र येऊन विद्यार्थ्यांना मदत करण्याची खूणगाठ बांधली.या कामी युवा नेते अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी या कामी खूपआर्थिक सहकार्य केले. या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी चेअरमन श्री. दिगंबर दुर्गाडे,माजीपरिषद सदस्य श्री. विराजभैय्या काकडे,युवा नेते अजिंक्य भैय्या टेकवडे,विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. संदेश पवार,श्री. हनुमंत पवार, सरपंच सीमा भुजबळ, ग्रा. पं.सदस्य श्री. विजय फाळके, मा.चेअरमन अमोल कदम, तालुका उपाध्यक्ष विक्रम,सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण, फाळके,मा. सरपंच दामुअण्णाकदम, मा. ग्रा. पं. सदस्य महादेव माने, श्री. संभाजी आबा कदम,ग्रामसेवक सुनिल माने, नितीन कदम,अशोकहवालदार,काळूराम कदम रूपेश इंदलकर, वरूण भोईटे, शरद जाधव, उमेश इंदलकर, अनिकेत माळवदकर मुख्याध्यापक श्री. सुधाकर गोतपागर सर, श्री. भगवान तुपे सर,श्री. दिलीप निंबाळकर सर, सौ. शोभा काळखैरे मॅडम, श्री. अमिन तांबोळी सर, माया कचरे मॅडम , श्री. भगवान जगताप, श्री. सुनिल जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जालिंदर घाटे सर यांनी केले.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातून बुलट ट्रेन जाणार? विमानतळ नंतर बुलट ट्रेन प्रकल्पाने शेतकरी चिंतेत.
पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मुद्धा एकीकडे गाजत असताना बुलेट ट्रेनप्रकल्पासाठी याच भागातील सहा गावातील जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.याबाबत प्रशासनाकडून मात्र ठोसकाही सांगितले जात नसल्यामुळे या भागातून बुलेट ट्रेन जणार का?अशी चर्चा गावच्या चावडीवर रंगू लागली आहे. मुंबईहैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या केंद्र शासनाच्या अती महत्वकांक्षी प्रकल्पाने वेग धरला आहे.महाराष्ट्र,कर्नाटक वतेलंगणा या तीन राज्यातील ७०० किलोमीटर अंतरावरील हजारो गावे यामध्ये बाधित होणार आहे.एकट्या पुणेजिल्ह्यातील ४५ गावातील जागेंचे भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे.मध्य रेल्वे प्रकल्पाच्यानियोजित मर्गाशेजारच्या दोन हजार फूट रुंदीच्या परिसरातील जमीन धारकांना बोलवून त्यांची माहिती गोळा केली जातआहे.त्यामध्ये त्यांना जामीन द्यायची आहे का? द्यायची असेल तर अपेक्षित किंमत,नोकरी हवी आहे का?जमिनीच्याबदल्यात इतर ठिकाणी जमीन अथवा दुकान असे पर्याय देण्यात आले असून कुटुंबाची तसेच प्रभावित होणाऱ्यापरिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील वाघापूर,आंबळे,टेकवडी,माळशिरस,राजुरी,पिसे या सहा गावातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागेचेसर्वेक्षण करून ठीक ठिकाणी लवण्यात आलेेले आहेत. पुरंदर प्रशासनाला मात्र या प्रकल्पाबाबत फारशी माहितीनाही,तसेच त्यांचा सहभागही यामध्ये दिसून येत नाही.याच भागातील काही गावांमध्ये विमानतळ प्रकल्प राबविण्याचाप्रयत्न सुरू असल्याने विमानतळ आणि बुलेट ट्रेन या दोन प्रकल्पामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. केंद्र शासनाच्या बुलेट ट्रेन या प्रकल्पाबाबत अद्याप कोणतीही माहिती आमच्या पर्यंत पोहोचलेली नाही-तहसीलदाररुपाली सरनोबत.
दौंडज येथील मोफत नेत्रतपासणीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
१५० जणांना चष्म्याचे वाटप : अजित युवा विकास प्रतिष्ठानचा उपक्रम मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दौंडज
पुरंदर! आंबळे येथे ६१ वृक्षांचे वृक्षारोपण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ६१ वा वाढदिवस साजरा
पुरंदर पुरंदर तालुक्यातील पुर्व भागात असणार्या आंबळे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या समोर तसेच रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात