पुरंदर तालुक्यात विजेचा लपंडाव

पुरंदर तालुक्यात विजेचा लपंडाव

शेतकरी त्रस्त

पुरंदर 

पुरंदर तालुक्यातील बहुतांशी गावात सध्या लाईटचा लपंडाव चालू आहे. प्रामुख्याने बेलसर, साकुर्डे, तक्रारवाडी, वाळुंज, निळूंज, खानवडी या गावांमध्ये सध्या वेळेवर विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी, लघुउद्योग आणि लसीकरणकेंद्रांवर विनाकारण ताण येत आहे. सद्यस्थितीला खरीप हंगाम बहरात असताना शेतीपंपाची लाईट दिवसा असतानाचलाईट ची दुरुस्ती आणि इतर कामे केली जातात त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.

बेलसर, साकुर्डे, तक्रारवाडी, वाळुंज,निळूंज, खानवडी या गावांना कृषी पंपाची वीज नियमित चालू असते.दररोज स्विचऑपरेट करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम करीत असतात, परंतु हे स्वीच ऑपरेट करताना वेळेवर स्वीच ऑपरेटहोत नाहीत. त्यामुळे लाईट वेळेवर न येणे बहुसंख्य वेळा विद्युत पुरवठा मध्येच खंडित होणे अशा अडचणी समोर येतआहेत. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता महावितरणचे कर्मचारी कुठलीही दाद देतनाहीत.स्विच सिंगल फेज चा थ्रीफेज सप्लायहि वेळेवर जोडला जात नाही. दररोज अर्धा ते एक तास उशिरा सप्लाय चालूहोतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

परिसरामध्ये महत्त्वाचा व्यवसाय म्हणून शेती हा आहे. शेतीसाठी लाईट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच बरोबर सर्वचलसीकरण केंद्रावर ऑनलाईन सिस्टीम द्वारे फॉर्म भरले जातात. त्यालाही लाईटच्या अडचणीमुळे अनेक समस्यांना तोंडद्यावे लागत आहे. एकीकडे वसुलीसाठी पुढे सरसावलेले महावितरण दुसरीकडे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी अव्वलदिसत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या महावितरण बद्दल नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *