महाराष्ट्र हादरवणारी घटना!!!!! सैतानापेक्षाही क्रूर,बायकोला संपवलं अन हरवली म्हणून गावभर शोधत राहिला;पोलीसांनी असा केला उलगडा

महाराष्ट्र हादरवणारी घटना!!!!! सैतानापेक्षाही क्रूर,बायकोला संपवलं अन हरवली म्हणून गावभर शोधत राहिला;पोलीसांनी असा केला उलगडा

पुणे

महाराष्ट्रामधून एक अत्यंत धक्कदायक घटना घडलीये. या घटनेनंतर संताप व्यक्त होतोय. पत्नीचा राग मनात धरून चक्क पत्नीची हत्या पतीने केलीये. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटकही केलीये. या घटनेनंतर परिसरात भातीचे वातावरणही बघायला मिळतंय.

पत्नी सारखा अपमान करत असल्याने पतीच्या मनात राग राहिला आणि त्याने धारधार शस्त्राने पत्नीचे हत्या केली. पतीने बँकेतून 5 हजार रुपये काढल्याने मित्रासमोर पत्नीने पतीला मारले आणि हाच राग पतीने मनात धरत पत्नींची हत्या केली.ही घटना अमरावती जिल्ह्यातील एकलविहीर येथे घडली आहे.

पत्नी शेजारीच असलेल्या जंगलात शेळ्यांना घेऊन गेली असता पती तिथे पोहोचला आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो गावात आला आणि पत्नीला शोधायचा नाटक केला. त्यानंतर जवळच्याच जंगलात महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आरोपी पतीला विचारपूससाठी बोलावले. आरोपी शालिग्राम धुर्वे याने पोलिसांना सुरूवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली.

त्यानंतर पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. शालिग्राम धुर्वे याला वरुड पोलिसांनी अटक केलीये. सतत शालिग्राम धुर्वे आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होत होते. शेवटी त्याने आपल्याच पत्नीची हत्या केली.कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये, याकरिता तो गावात पत्नीला शोधत होता.

शालिग्राम धुर्वे याने पहिल्यांदा पत्नीला बेशुद्ध केले आणि त्यानंतर धारधार कुराडीने तिच्यावर वार केले आणि त्यामध्ये त्याच्या पत्नीचा जीव गेला. पत्नीचा मृतदेह जंगलात सोडून शालिग्राम धुर्वे गावात परतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीचा मृतदेह सापडला.

शालिग्राम धुर्वे याने सांगितले की, नेहमीच त्याची पत्नी त्याला शिवीगाळ करत असत. लोकांमध्ये त्याचा अपमान करायची. त्यामुळेच त्याच्या मनात राग होता आणि जशीही त्याची पत्नी शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली तसेच तो तिच्या मागे गेला आणि तिची हत्या केली. आरोपी शालिग्राम धुर्वे हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला अटकही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *