पुणे
गावात सुविधांसाठी लोकप्रतिनिधींच्या मागे लागत असतात. तरी देखील सुधारणा न नसल्याने ग्रामस्थ उपोषणाला बसतात. मात्र गावात सुविधा मिळत नसल्याने संतप्त होत ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यात घडला आहे.
गावात मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यात पहावयास मिळाला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहे.
गावात कसल्याही सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावले आहे. त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात आली आहे. गावाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत.
शिवाय ग्रामपंचायतीला थेट निधी देखील येत असतो. मात्र १८०० लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.