संजय राऊत यांना यानामध्ये बसवून चंद्रावर पाठवायला पाहिजे होतं;महाराष्ट्राची किड गेली असती

संजय राऊत यांना यानामध्ये बसवून चंद्रावर पाठवायला पाहिजे होतं;महाराष्ट्राची किड गेली असती

पंढरपूर 

सत्ता होती, आमदारांना डांबून ठेवता आले असते, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण उद्धव ठाकरे आम्हाला कुठ डांबायाला निघाले आहेत. तुम्ही स्वतःला डांबून घेतल्यानेच ही वेळ आली आहे; असा टोला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू‌ पाटील यांनी लगावला आहे.

आज आमदार शहाजी पाटील यांच्या महूद गावात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विषयी फटके बाजी केली.मोदी साहेबांनी एक चूक केली. संजय राऊत यांना यानामध्ये बसवून चंद्रावर पाठवायला पाहिजे होतं. महाराष्ट्राची किड गेली असती.

संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये. त्यांची लय आबदा होईल असा सल्ला ही आमदार पाटील‌ यांनी दिला. उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांविषयी मोठं व्यक्तव्य केलं आहे. माझ्या हातात सत्ता होती.

आमदारांना डांबून ठेवता आलं असतं, पण माझ्या नितिमत्तेत बसत नाही असं विधान केलं होतं. त्यावर आमदार शहाजी बापू‌ पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्याविषयी टिप्पणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *