चक्क आमदारांच्या पत्रालाच महावितरणने दाखवली केराची टोपली;”पुरंदर” तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणी आहे का वाली?

चक्क आमदारांच्या पत्रालाच महावितरणने दाखवली केराची टोपली;”पुरंदर” तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणी आहे का वाली?

पुरंदर

पुरंदर तालुक्यात विज बिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा जो महावितरणने तगादा लावला आहे. त्या दगाद्या विरोधात पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी महावितरणने सरसकट रोहित्र बंद न करता वीज पुरवठा सुरळीत करावा,अन्यथा आंदोलनाच्या इशाऱ्याचे पत्र दिले होते.

परंतु त्या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखवल्याचे सध्या चित्र पुरंदर तालुक्यात दिसत आहे.कारण अजूनही पुरंदर तालुक्यातील बहुसंख्य भागात वीज पुरवठा सुरळीत झालेला दिसून येत नाही. बरेचशा शेतकऱ्यांचा गहू हा एक ते दोन पाण्यावर आलेला असून काढणी योग्य पिकाला पाण्याची गरज असताना महावितरण ने केलेला हा आडमुठेपणा पाहता शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील शेतकरी हे वीज बिल भरण्याची तयारी दाखवत असताना देखील महावितरणची मुजोरी थांबण्याचे नाव घेतच नाही. महावितरणच्या अशा या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास होत असून शेतकऱ्यांना सध्या कोणीच वाली नसल्याचे चित्र पुरंदर तालुक्यात पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *