कुठल्याही परिस्थितित जमिन देणार नाही

कुठल्याही परिस्थितित जमिन देणार नाही

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील रिसे,पिसे,राजुरी,नायगाव, पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी,चांदगुडेवाडी,आंबी खुर्द यापरिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.पणत्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.यासाठी नायगावयेथे  ग्रामस्थांची बैठक (शनिवार दि २६/०६/२०२१)संपन्न झाली. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या भागात विमानतळहोण्यास तीव्र विरोध दर्शविला. व एक इंचही जमीन विमानतळाला द्यायची नाही असा उपस्थितांच्या वतीने ठराव करण्यातआला.

यावेळी बोलताना सरपंच हरिदास खेसे म्हणाले 

आमच्या जमिनी बागायती असताना जिरायती का दाखविल्या.पुढील विरोध कसा करायचा.मोर्चा,आंदोलन यासाठीआपण सर्वांनी पुढील दिशा ठरवायची आहे.

अनिल शेंडगे म्हणाले पारगाव मध्ये जसा विरोध होता तसा विरोध आपण करूया.मोठ्या प्रमाणात विरोधकरूया.बागायती क्षेत्र वाढले आहे.

चंद्रकांत चौंडकर म्हणाले विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घ्या.

महेश कड म्हणाले विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे.शेवट पर्यंत विमानतळालाआमचा विरोध आहे.

महेंद्र खेसे म्हणाले विमानतळ आपल्याला गावात नको व इतर गावात नको.आपले क्षेत्र जिरायती दाखवले आहे तेबागायती आहे.शासनाला खोटी माहिती देण्यात आली आहे.

बाळासाहेब कड म्हणाले पुरंदर उपसा व जनाई उपसा सिंचन योजनेमुळे आपला भाग सदन झाला आहे.सर्व पक्षीय जोडेबाजूला ठेऊन विमानतळाचे भूत हटऊया.शेतकरी पुत्र म्हणून माझा कायम विरोध आहे.आमदार सुध्दा शेतकऱ्यांच्या बरोबरआहेत.टॅक्टर मोर्चे काढुया.

प्रदिप खेसे म्हणाले आमदारांनी विश्वासात घेतले नाही.राजकीय हित संबंध जोपासले.मी शेवटच्या घटकापर्यंतविमानतळाला विरोध करणार आहे.

सदाशिव चौंडकर म्हणाले पारगाव,चाकण येथील लोकांनी विरोध केला विमानतळ हाटले.त्यामुळे आपणही विरोध करूनविमानतळ हाटऊया.गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे.आमदारांना विरोधाचा ठराव देऊ.

बारीकराव खेसे म्हणाले विमानतळ होऊच नये.आपल्या जमिनी कसल्याही परिस्थितीत द्यायच्या नाहीत.जमिनीच्या गटप्रमाणे शेतकऱ्यांनी सह्या घ्या.

यशवंत कड म्हणाले आम्हाला परदेशात जायचे नाही.आम्हाला विमानतळ नको.आमदार, खासदार,पवार साहेब आपल्याविरोधात जाणार नाही. जन्मभूमी, मातृभूमी सोडायची नाही.

विलास खेसे म्हणाले नायगावमधली इंच भरही जमीन आम्ही देणार नाही असा सर्वानुमते ठराव करूयात.

यावेळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ : नायगाव(ता.पुरंदर) येथे आपले विचार मांडताना विलास खेसे व इतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *