पुरंदर तालुक्यात पहिल्यांदाच भरणार “या” ग्रामपंचायतीत जनता दरबार

पुरंदर तालुक्यात पहिल्यांदाच भरणार “या” ग्रामपंचायतीत जनता दरबार

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील परिंचे ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवार दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 10 वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर परिंचे येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिंचे गावच्या सरपंच ऋतुजा जाधव यांनी दिली. जनता दरबारासाठी परिंचे गावात काम करणारे सर्व शासकीय कर्मचारी उपस्थित राहणार असून लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे.

बुधवारी शासनाच्या योजना सर्व माहिती मिळणार आहे. यावेळी तहसील कचेरी, ग्रामपंचायत विभाग, तलाठी कार्यालय, कृषी खाते, एमएसईबी विभाग, रेशनिंग विभाग, एसटी विभाग, वन विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, पेन्शन विभाग, आरोग्य विभाग, सोसायटी विभाग, पीडीसीसी बँक, पशुसंवर्धन विभाग, पोस्ट विभाग, अंगणवाडी विभाग, बचत गट विभाग, जलसंधारण विभाग या संबंधित प्रश्न ग्रामस्थांना मांडता येतील. लोकांच्या अडचणी,समस्या यांचा पाठपुरावा ग्रामपंचायतीच्या मार्फत केला जाणार असल्याचे सरपंच ऋतुजा जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *